HW News Marathi
देश / विदेश

निवडणूक आयोगाने भाजपला खडसावलं; प्रचारसाहित्यांमधून ‘पप्पू’ शब्द वगळण्याचे आदेश

गुजरात निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच निवडणूक आयोगाने भाजपला खडसावलं आहे. गुजरातमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भाजपला ‘पप्पू’ या नावाचा वापर करण्याला निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रचाराशी संबधित पोस्टर, होर्डिंग, जाहिराती, बॅनर आदी साहित्यांमधून ‘पप्पू’ नाव हटवण्याचे आदेश एका पत्राद्वारे निवडणूक आयोगाने भाजपला दिले आहेत. गुजरात निवडणूक आयोगानुसार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधणे मर्यादेचे उल्लंघन केल्यासारखे आहे. भाजपच्या प्रचार साहित्याचे परिक्षण केल्यानंतर ‘पप्पू’ या शब्दाचा अपमानजनक वापर

करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर भाजपने नाराजी दर्शविली आहे.आमच्या प्रचार साहित्यात कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगाचा हा आदेश योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. गुजरातमध्ये १८२ विधानसभेच्या जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार असून या निवडणूकांचा निकाल १८ डिसेंबरला लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती – नरेंद्र मोदी

News Desk

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने केली अटक

swarit

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

News Desk
देश / विदेश

रामजन्म भुमी वगळता कुठेही मशीद बांधता येईल- सुब्रमण्यम स्वामी

News Desk

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. रामजन्मभुमी वगळता कुठेही मशिद बांधता येईल अस वक्तव्य स्वामी यांनी केलय. सौदी अरेबियामध्ये मशिदी तोडण्यात आल्यानंतर त्या मशिदींची जागा बदलण्यात आली होती. त्याच धर्तीवर भारतात देखील बाबरी मशिद मुस्लीम बहुल भागात हलवण्यात येऊ शकते असं स्वामी यांनी सुचवल्यामुळे नवी वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. भारतातील तब्बल २४००० मंदीर प्राचीन काळात तोडण्यात आली होती. आम्ही यापैकी फक्त मथुरेचं कृष्ण मंदीर, अयोध्येचं राम मंदीर आणि वाराणसीचं काशी विश्वनाथ या मंदिरांच्या उभारणीसंदर्भातच बोलत असल्याचही त्यांनी म्हटलय.

बाबरी मशिद प्रकरण हे सध्या सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. या प्रकरणात कोर्टाबाहेरच सेटलमेंट करण्याचा पर्याय देखील सुप्रीम कोर्टानं सुचवला होता.

Related posts

फ्रान्समधील हल्ल्यानंतर धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करणाऱ्यांना सामनातून सुनावले खडे बोल

News Desk

…तर कोरोना आणखी वाढण्याचा धोका, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट

News Desk