HW News Marathi
देश / विदेश

EVMHacking : ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित !

नवी दिल्ली | भारतात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंगबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. म्हणून त्यांची हत्या झाली, असा गौप्यस्फोट एका अमेरिकन सायबर हॅकरकडून करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “या प्रकरणाचा वेगळा तपास केला जात आहे. कायदेशीर कारवाई करण्याचा देखील विचार सुरु आहे,” असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

“निवडणुकांदरम्यान वापरले जाणारे ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहे. हे ईव्हीएम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून तयार करण्यात आले आहे. ते कडेकोट देखरेखीत तयार होते”, असे या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.लंडनमध्ये आयोजित हॅकेथॉनमध्ये सय्यद सुजाने ईव्हीएम हॅक होऊ शकतात, असा दावा केला गेला. यावेळी “भाजपच नव्हे तर आम आदमी पक्षानेही ईव्हीएम हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, २०१५ साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला”, असाही दावा या अमेरिकन हॅकर सय्यद सुजाकडून करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानने दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे थांबविले नाही तर पाणी रोखू !

News Desk

संघप्रमुख मोहन भागवतांनी माफी मागावी | नवाब मलिक

News Desk

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही- सुप्रिम कोर्ट

News Desk