HW News Marathi
देश / विदेश

आज कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार  

बंगळुरु | कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्या आघाडीची सरकार स्थापन झाली आहे. या आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. जेडीएसचे १२ आणि काँग्रेसचे उपमुख्यमंत्रीसह जवळपास २२ आमदार आज दुपारी २ वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

२३ मे रोजी जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री तर काँग्रेसचे डॉ. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दोन्ही पक्षांच्या किती आमदारांना मंत्रिमंडळात सामील करुन घेतले जाणार यांची संख्या अद्याप स्पष्ट झाली नाहीये.

काँग्रेसच्या वाटेला गृह, आरोग्य आणि कृषी आशी खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर जेडीएसला अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम ही खाते देण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच काही पदे रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

News Desk

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरालाच टाळे लावले! सामनातून केंद्रावर निशाणा

News Desk

“माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो” | दीपिका सिंह

News Desk
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक

News Desk

पुणे | पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजकांना भीमा कोरेवाग दंगली प्रकरणी अटक केली आहे. यात एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुणे, दिल्लीतून माओवाद्यांचे नेते रोना विल्सन आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपूर या तिघांना पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अटक केले आहे. मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी या तिघांना अटक केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने १ जानेवारी २०१८ रोजी आंबेडकरी अनुयायी येथे आले होते. तेव्हा दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून दगड फेक झाली होती. यात एक जण जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडें यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिलिंद एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

या दंगलपूर्वी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना या तिघांचे कनेक्शनातून आढळून आले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात या तिघांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले होते.

Related posts

“…तर तुरुंगात बसून एसटीपण चालवू शकतील”, भाजपचा अनिल परबांना टोला

News Desk

संजय राऊतांनी सव्वा रुपयांची किंमत वाढवावी, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर!

News Desk

“ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना कळवळा कुठे होता?”,रोहिणी खडसेंचा फडणवीसांना सवाल

News Desk