HW News Marathi
देश / विदेश

त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या जवानांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील त्राल परिसरात भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (७ एप्रिल) सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांकडून २ ते ३ दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळत आहे. सध्या गोळीबार थांबला असून सुरक्षा दलाच्या जवानांकडून या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

शोपियान जिल्ह्यात इमाम साहिब परिसरात शनिवारी (६ एप्रिल) झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राहिल राशिद शेख आणि बिलाल अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे होती. त्यापैकी राहिल हा गांदरबल जिल्ह्यातील रहिवासी असून तो तीनच दिवसांपूर्वी संघटनेत सामील झाला होता. विशेष म्हणजे राहिल याचे एमटेकपर्यंत शिक्षण झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत- सामना

News Desk

जाणून घ्या…लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ?

News Desk

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज’विमानतळ करण्यास मान्यता !

Arati More