HW News Marathi
देश / विदेश

बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेप कायम

अहमदाबाद | गुजरात उच्च न्यायालयाने नरोदा पाटिया दंगलीत महत्वाचा निकाल दिला आहे. न्यायलयाने गुरुवारी दिलेल्या निकालाप्रमाणे या प्रकरणात माजी मंत्री माया कोडनानी यांना निर्दोष ठरवत त्यांची सुटका केली असून बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालायने हरीश छारा आणि सुरेश लांगडाला यांनाही दोषी ठरवले आहे. अहमदाबादच्या विशेष एसआयटी कोर्टाने बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

26 फेब्रुवारी, 2002 रोजी साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्टेशनवर पोहोचली असता अयोध्याहून परतलेले 57 कारसेवक असलेल्या बोगीत आग लावली होती. यानंतर संपूर्ण गुजरातमधील वातावरण बिघडले. गुजरातमध्ये दंगली भडकल्या. याच साखळीत 28 फेब्रुवारी, 2002 रोजी अहमदाबादच्या नरोदा पाटियामध्ये दंगल भडकली, या दंगलीत 97 लोकांची हत्या करण्यात आली होती.

नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणात तत्कालिन मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि नरोदाच्या आमदार माया कोडनानी, बजरंग दलचे माजी नेते बाबू बजरंगी, स्थानिक भाजप नेते बिपिन पांचाळ, किशन कोरानी, अशोक सिंधी आणि वकील राजू चौमाल यांच्यासह 61 लोकांना आरोपी घोषीत करण्यात आले होते. या हत्याकांडाची कारवाई ऑगस्ट 2009 मध्ये सुरु झाली होती. यात 62 आरोपींविरोधात आरोप दाखल करण्यात आले. या सुनावणी दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यामध्ये सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी

News Desk

‘कोरोना’ संसर्गाने ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन’ व्हा !

News Desk

गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला ठोकल्या बेड्या

News Desk