HW News Marathi
देश / विदेश

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

ढाका | भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना आणखी एका प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झिया चॅरिटेबल ट्रस्टच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. तसेच झिया यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठवला असून दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अधिक कारावास ठोठावण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे झिया यांना यंदा डिसेंबर महिन्यात होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवता येणार नाही.

खालिदा झिया (वय ७३) गेल्या फेब्रुवारीपासून अनाथालयातील निधी अपहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना या प्रकरणी यापूर्वीचआधीच पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात ‘बीएनपी’च्या अध्यक्ष असलेल्या बेगम खलिदा झिया या १९९१-९६ आणि २००१ ते २००६ या कालावधीत पंतप्रधान होत्या. या प्रकरणात खालिदा झिया आणि त्यांचा मोठा मुलगा तारिक रहमान याच्यासह पाच लोकांवर २००१ से २००६ दरम्यान बांगलादेश पंतप्रधान पदावर असताना २ लाख ५३ हजार डॉलर रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

CDS बिपीन रावत यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यानंतर चिराग पासवान यांचे भावनिक पत्र 

News Desk

पंतप्रधान फिट, देश अनफिट

News Desk
मनोरंजन

FLASHBACK 2018 : भारतीय अंध क्रिकेट संघ जगात सरर्वोत्तम

News Desk

वर्षाची सुरुवात झाली ती यंदा एका अतिशय आनंददायी घटनेने. भारतीय क्रीकेट जगतासाठी ही अतिशय उत्साहपुर्ण अशी घटना होती. भारताच्या अंध क्रिकेट संघाने ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावे केला. विषेश म्हणजे भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये आपला कायमच प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला २ विकेट ने हरवून विश्वकप आपल्या नावे केला. अभिमानाची बाब म्हणजे भारतीय अंध क्रिकेट संघाने हा विश्वकप दुसऱ्यांदा आपल्या नावे केला आहे.

पहीली खेळी पाकिस्तानने करत भारतीय संघापुढे ८ गडी गमावून ३०७ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार खेळी करत ३८.४ ओवर मध्येच दोन गडी राखुन पाकीस्तानवर दमदार विजय मिळवला.

असा होता भारत पाकीस्तानचा हा सामना

पाकीस्तानने पहीली खेळी करत ३०७ धावांचे आव्हान भारतीय संघापुढे ठेवले होते. पाकीस्तानने ८ गडी गमावून हे आव्हान उभे केले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजय रेड्डी याने ६० चेंडूत ६२ धावा केल्या तर खेळाडू रमेश याने ६७ चेंडूत ९३ धावा केल्या. प्रकाश आणि व्यंकटेश यांनी खेळाची दमदार सुरुवात केली. या दोघांनीही प्रति ओवर १० धावांच्या गतीने स्कोर बनवत भारतीय संघाला विजयाचा मुकूट घालण्यास मोलाची भर घातली.

व्यंकटेशने ३२ चेंडूत ३५ धावा केल्या तर प्रकाश ने ४२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. २०१४ मध्ये सुध्दा याच भारतीय संघाने दक्षिण अफ्रीकेच्या केप टाउन मध्ये पाकीस्तानलाच हरवून विश्वकप जिंकला होता. काही दिवसांपुर्वी इंग्लडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार एड हॉसेल यांने भारतीय अंध क्रिकेट संघ हा जगातला सर्वोत्तम संघ असल्याचे म्हणत भारतीय अंध क्रिकेट संघाचे कौतुक केले होते.

Related posts

राजाच्या दरबारी पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की

News Desk

जाणून घ्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या चित्रपटाचे किती होते मानधन

News Desk

ठाकरे सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंगलाच निर्माते व दिग्दर्शकांमध्ये रंगले मानआपमान नाट्य

News Desk