HW News Marathi
देश / विदेश

आसामची सत्ता आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार !

गुवाहाटी | “आम्ही भाजपा आणि आरएसएसला आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही आसामची सत्ता नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार, तर आसामची जनताच चालविणार आहे,” अशा शब्दात काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी गुवाहाटीमध्ये नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचा खरपूस समाचार घेतला आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “देशाभरात जिथे जिथे भाजप जाते तिथे तिथे द्वेषाचे राजकारण करत आहे. देशातील युवावर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. संपूर्ण देशात हेच वातावरण आहे. मात्र, आंदोलकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. जनतेचा आवाज भाजपला ऐकायचा नाहीय. तुमच्या आवाजाची भीती या सरकारला वाटतेय. जनतेच्या आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न मोदी सरकारने आखले, असा आरोप राहुल यांनी भाजपवर केला. दरम्यान, सीएए आणि एनआरसीला ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार विरोध होत आहे. तिथे या कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण नंतर देशभरात पसरले होते. उत्तर प्रदेश, दिल्लीसह काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळणही लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी आणि जीएसटी लादून देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. भारतमातेवर आघात करण्याचे काम त्यांनी केले आहे. देशात आज बेकार युवक नोकरीसाठी वणवण भटकत असून या सरकारने किती लोकांना रोजगार दिला हे मोदींनी सांगायला हवे, असे आव्हानच राहुल यांनी दिले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

News Desk

‘नया है वहं’मंत्री झाले म्हणून शहाणपण येत नाही,फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा !

News Desk

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार!

News Desk