HW News Marathi
देश / विदेश

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

लखनौ । एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झालेल्याची धक्कादायक घटना अलाहाबादमध्ये घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. ही धक्कादायक घटना सोरांव परिसरातील असून प्रताप सिंह, त्यांची पत्नी किरण, सात वर्षांचा मुलगा विराट आणि पत्नी किरण यांची आई कमलेश देवी या चारही जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मात्र या चौघांच्या हत्येचे कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

परंतु मारेक-यांनी सिंह यांचा एक वर्षाच्या मुलीला जिवंत सोडले. या मुलीचा जन्म महिन्याभरापुर्वीच झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सिंह यांच्या शेजा-यांना या चिमुकलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. ही मुलगी का रडते आहे, हे विचारण्यासाठी शेजा-यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांना काही उत्तर मिळाले नाही. शेवटी शेजा-यांनी घरी जावून पाहिले तेव्हा धक्काच बसला. लहान मुलीव्यतिरीक्त सर्व जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजारच्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यामागचे कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

News Desk

दिल्लीतील CBI मुख्यालयाला लागली आग,५ बंब दाखल

News Desk

मुंबई हल्ल्यामागचा म्होरक्या हाफिज सईदला १० वर्षांचा कारावास

News Desk
महाराष्ट्र

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात

News Desk

जळगाव । डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला असून जळगावमधील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात यावल तालुक्यातील साकळी येथे विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (२२) या तरुणाला गुरुवारी ताब्यात घेतले. डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर वापरण्यात आलेले वाहन हे साकळी येथील असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

साकळी येथे विशालचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. गेल्या 7 ते 10 वर्षांपासून तो साकळी येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे. एटीएसची दोन पथके येथे दाखल झाली होती. एका पथकाने विशालला ताब्यात घेऊन तात्काळ अज्ञातस्थळी हलवले आणि त्यानंतर दुसऱ्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. दोन तास घेतल्या गेलेल्या या झडतीत नेमके कोणते पुरावे हाती लागले याबाबत अद्याप एटीएसने कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Related posts

“महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे”, संजय राऊत कडाडले  

News Desk

आता मराठ्यांच्या गनिमी कावा आंदोलन

News Desk

वाधवान कुटुंब महाबळेश्वरला कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने गेले, सीएम आणि गृहमंत्र्यांना फडवीसांचा सवाल

News Desk