HW News Marathi
देश / विदेश

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

लखनौ । एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झालेल्याची धक्कादायक घटना अलाहाबादमध्ये घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. ही धक्कादायक घटना सोरांव परिसरातील असून प्रताप सिंह, त्यांची पत्नी किरण, सात वर्षांचा मुलगा विराट आणि पत्नी किरण यांची आई कमलेश देवी या चारही जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मात्र या चौघांच्या हत्येचे कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

परंतु मारेक-यांनी सिंह यांचा एक वर्षाच्या मुलीला जिवंत सोडले. या मुलीचा जन्म महिन्याभरापुर्वीच झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सिंह यांच्या शेजा-यांना या चिमुकलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. ही मुलगी का रडते आहे, हे विचारण्यासाठी शेजा-यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांना काही उत्तर मिळाले नाही. शेवटी शेजा-यांनी घरी जावून पाहिले तेव्हा धक्काच बसला. लहान मुलीव्यतिरीक्त सर्व जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजारच्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यामागचे कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याच्या मंत्रीमंडळाची आज पुनर्रचना, ४ नव्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ जबाबदारी

News Desk

शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प! – प्रितम मुंडे

Aprna

मनी लाँड्रिंग ॲक्टच्या घटनात्मक वैधते विरोधात रॉबर्ट वाड्राची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

swarit