HW News Marathi
देश / विदेश

स्वातंत्र्य ही काश्मिरी जनतेची प्राथमिक मागणी | सैफुद्दीन सोझ

श्रीनगर | काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य मिळणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे धक्कादायक विधान काँग्रेसचे काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केले आहे. काश्मीर दोन्ही देशांशी जोडल्यामुळे त्याला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. तसेच काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण होण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नसल्याचे देखील सोझ यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच ‘काश्मीरमधील जनतेला स्वतंत्र काश्मीर हवे आहे,’ अशी भूमिका पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देखील मांडली होती. मुशर्रफ यांची ही भूमिका बरोबर होती, असे देखील सोझ यांनी म्हटले आहे. सोझ पुढे म्हणाले, माझ्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. सैफुद्दीन सोझ हे युपीएच्या काळात मंत्री राहिले असून त्यांनी ‘काश्मीर ग्लिंपसेस ऑफ हिस्ट्री अँन्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल’ हे पुस्तक लिहले आहे. हे पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिकेडून भारताला दिवाळी भेट

News Desk

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar
मुंबई

बेस्ट बस मागे घेताना युवतीचा मृत्यू

swarit

मुंबई | कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस डेपो परीसरात शुक्रवारी सकाळी दोन बेस्ट बसेसमध्ये अपघात झाला. या अपघातात एका युवतीला प्राण गमवावा लागला. बेस्ट बस मागे घेत असताना दुसऱ्या बसला धडकली. या दोन्ही बसच्या मध्ये आल्यामुळे त्यात युवतीचा मृत्यू झाला. अपघातानंतर युवतीला लगेचच जवळच्या भाभा रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर युवतीला मृत घोषित केले आहे.

या युवतीचे नाव मुर्तुजा शेख (२० वर्षीय ) असून ती मालाडची रहिवासी होती. मुर्तुजा बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथील एच डी एफ सी बँकेत कामा करत असे. दररोज सकाळ आणि संध्याकाळ कुर्ला स्टेशनवर प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी असते प्रवासी कामाला जाण्यासाठी किंवा घरी जाण्यासाठी धावपळीत असतात. त्यातच आज हा प्रकार घडला.

खरेतर कंडक्टरच्या मदतीशिवाय चालकाने बस मागे घेऊ नये. कारण असे केल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. यापूर्वी सुद्धा चालकाने कंडक्टरच्या मदतीशिवाय बस मागे घेतल्यामुळे काही अपघात झाले आहेत. या अपघातात सुद्धा चालकाच्या बरोबरीने कंडक्टरची चुकी असण्याची दाट शक्यता आहे. ज्या भागात हा अपघात घडला तो वर्दळीचा रस्ता आहे. नेहमीच इथे वाहतूक कोंडीची स्थिती असते. त्यामुळे अशा परिसरात बस मागे घेताना प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे.

Related posts

मालकाच्याचं घरी डल्ला मारणाऱ्या चोरट्याला 24 तासात अटक; 46 लाखांच्या मालमत्तेस बिहारमधून घेतले ताब्यात

Chetan Kirdat

नालासोपाऱ्यातील स्फोटके प्रकरणी घाटकोपरमध्ये एटीएसकडून एकाला अटक

swarit

मुंबईतील सभेत ओवैसींवर चप्पल फेकली

News Desk