HW News Marathi
देश / विदेश

आम्हाला शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांची मागणी

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरातील पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या विषयावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याबाबत कोणतीही दिलगिरी व्यक्त न करता उलट भारतालाच इशारा दिला होता. आता मात्र इम्रान खान यांनी “आम्हाला शांततेची एक संधी द्या”, अशी मागणी भारताकडे केली आहे.

“पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापलेला आहे. आम्ही या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी जलद गतीने पावले उचलत असून यावेळी बरोबरीचा हिशोब चुकता केला जाणार. हा बदललेला भारत हे दुख: सहन करणार नाही. दहशतवादाला कसे चिरडायचे ते आम्हाला चांगलेच कळते”,असे मोदींनी राजस्थानमधील एका सभेत म्हटले होते.

“इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा देण्यास फोन केला तेव्हा मी पठाणचा मुलगा असून शब्द पाळणार असल्याचे ते म्हणाले होते. आता बघू काय करतात’ असेही मोदी यावेळी म्हणाले. त्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. “आम्ही आमच्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्याबाबत ठोस पुरावे दिले तर आम्ही तात्काळ कारवाई करू. पंतप्रधान मोदींनी आम्हाला शांततेची एक संधी द्यावी”, अशी मागणी इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे आणि विमान वाहतूक सेवाही ३ मेनंतर सुरू होणार

News Desk

छुप्या पद्धतीने उत्तर कोरीया बनवतेय जैविक हत्यारं 

News Desk

विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत उद्या सुनावणी ?

News Desk