HW News Marathi
देश / विदेश

न्यायालयात जाणं म्हणजे पश्चात्ताप करून घेण्यासारखं ! माजी सरन्यायाधीशांचे विधान

नवी दिल्ली । देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. एका वृत्तवाहिनीने शनिवारी (१३ फेब्रुवारी) आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना माजी सरन्यायाधीश गोगोई म्हणाले की, “न्यायालयात जाणे म्हणजे पश्चात्ताप करून घेण्यासारखे आहे.” माजी सरन्यायाधीशांनी न्याय व्यवस्थेबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

रंजन गोगोई यावेळी या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, “देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही.” पुढे गोगोई म्हणाले की, ” आपली न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. जेव्हा संस्थांची कार्यक्षमता कमी होते तेव्हा वाईट अवस्था असते. यंदा कनिष्ठ न्यायालयात ६० लाख, उच्च न्यायालयात ३ लाख, सर्वोच्च न्यायालयात ७ हजार खटल्यांची भर पडली.”

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत गोगोई यांच्यावर केलेल्या टिकेवर, त्याबाबतच्या कारवाईवर बोलताना गोगोई म्हणाले की, “त्या महिला खासदाराला या प्रकरणातील योग्य गोष्टी ठाऊक नाहीत. त्यावेळी ते प्रकरण मी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे दिले होते. त्यांनी चौकशी समिती नेमली होती. मोठय़ा कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. कारण जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुम्ही तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaVerdict : जाणून घ्या.. अयोध्या प्रकरणाचा घटनाक्रम

News Desk

एटीएम झाले जप्त,पहा…कसलं होतं एटीएम

News Desk

कर्नाटकच्या जनतेचा काँग्रेस विरोधात कौल – अमित शहा

News Desk