HW News Marathi
देश / विदेश

स्वातंत्र्य दिनी हजर रहा, सरकारी बाबूंना आदेश

नवी दिल्ली | अवघ्या काही दिवसांवर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा, असा आदेश दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सरकारचे सर्व मंत्री, महत्त्वाचे राजकीय नेते, राजदूत, उच्चायुक्त उपस्थित असतात. पुढील स्वातंत्र्य दिनाआधी देशात सार्वत्रिक निवडणुका होत असल्यानं मोदी सरकारसाठी हा स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्य दिनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व विभागांना १ ऑगस्ट रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांकडून या सूचना देण्यात आल्या असून त्यामधून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान देशाला संबोधित करत असल्यानं हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सोहळ्यास उपस्थित राहावे,’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदाच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी पाचव्यांदा देशातील नागरीकांना लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार आहेत. त्यामुळे हा दिवस प्रचंड महत्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाला उपस्थित न राहणा-या सर्व सरकारी बाबुंची गंभीर दखल घेतली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील

News Desk

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

News Desk

प्रतिभेने ‘उंबरठा’ सोडला!

News Desk
महाराष्ट्र

जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा ? | अशोक चव्हाण

swarit

नांदेड | भाजप सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु फडणवीस यांना सत्तेत येऊन ४ वर्षा झाले असून देखील हे प्रश्न सुटले नाही.तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, अशा अनेक मुद्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तोडसूक घेतले.

न्यायालयाने मुस्लीम समाजाला आरक्षण दिले असून सुद्धा मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत मेगाभरतीवर स्थगित करण्यात आली आहे. मेगा भरतीवर स्थगिती आल्यानंतर सर्वच समाजातील तरुणांचे नुकसान होणार आहे. काँग्रेसच्या काळात मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. परंतु काँग्रेसने कधीही आरक्षणाच्या मुद्याचे राजकारण केले नाही. मात्र भाजप सरकारने आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Related posts

लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन

News Desk

पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी; नितीन गडकरींची आक्रमक भूमिका

Aprna

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे बैठक संपन्न

Aprna