HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

श्रीनगर | पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून भारतीय लष्कराचे कॅम्प आणि राजधानी दिल्लीवर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

काश्मीरमधील लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी गस्ती पथके, पोलीस, सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

तसेच राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दहशवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतील काही मॉल्स असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाणी हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकमधून घुसखोरी करणारे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबा दोन्ही संघटनांपैकी नक्की कोणत्या संघटनांचा हात असण्याची माहिती अद्याप गुप्तचर संघटनांना मिळाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

News Desk

पंडित नेहरूंच्या स्मृतीदिनी जयंत पाटलांनी शेअर केला अटलबिहारी वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ

News Desk

तीन तलाक आणि निकाह- हलाला सारख्या कुप्रथांचे निर्मूलन आवश्यक | राष्ट्रपती

News Desk
मुंबई

आज देखील ती धावली…   

swarit

मुंबई | भारतातल्या पहिल्या सुपरफास्ट रेल्वेला म्हणजेच डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला १ जून २०१८ रोजी ८८ वर्षे पूर्ण झाली. दक्खनची राणी म्हणून ओळखली जाणारी ही रेल्वे १ जून १९३० रोजी महाराष्ट्रातील २ महत्वाच्या असणा-या शहरांच्या सेवेसाठी रुळावर उतरली. या निमित्ताने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनस येथे कामगारांसह प्रवाश्यांनी दख्खनच्या राणीचा ८८ वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

भारताची व्यापारी राजधानी म्हणून मुंबईच्या वाढीनंतर, डेक्कन क्वीन ही पुण्यात राहणा-या लोकांसाठी उत्तम वाहतूक व्यवस्था आहे. मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास या रेल्वेने १ तासाहून कमी केला आहे. प्रारंभीपासून रेल्वेने अनेक सुधारणा करत प्रवाशांच्या सोईसाठी उच्च दर्जाचा आराम देण्याकडे ही या रेल्वेने भर दिला आहे. सध्या, डेक्कन क्वीन ४ एसी चेअर कार, एक बुफे कार, १०- द्वितीय श्रेणी चेअर कार आणि दोन सेकंदांच्या कमांड ब्रेक व्हॅनसह १७ कोचसह चालते हे या डेक्कन क्विनचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

 

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीतच

swarit

निवडणुक खर्चावर मर्यादा

News Desk

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

News Desk