HW News Marathi
Covid-19

२० लाख कोटींमध्ये किती शून्य ? अर्थमंत्र्यांचीच झाली तारांबळ

मुंबई | कोरोनामुळे ढासलेल्या आर्थिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१२ मे) २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यानंतर ट्वीटरवर #20lakhcrores ने ट्रेंड करण्यास सुरवात झाली. यात देशाला घोषित केल्या आर्थिक पॅकेजपेक्षा २० लाख कोटीमध्ये किती शून्य असता हे जाणून घेण्यास लोकांची उत्सुकता दिसून आली. या ट्रेंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी केलेले ट्वीट अवघ्या काही मिनिटात व्हयारल झाले.

अनुपम खेर ट्वीटमध्ये म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकते आणि प्रेरणा घेते. १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली बाळगून वाटचाल करतील तर यश निश्चितच मिळेल. २०,००,००० कोटी असं दिसतात – २०००००००००००००! गणित बरोबर आहे ना? बहुधा!”

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ट्वीट करत म्हणाल्या,” ‘आत्मनिर्भर भारत अभियान’च्या दृष्टीने हे आर्थिक पॅकेज ही मोठी घोषणा आहे. या आर्थिक पॅकेज भारताच्या जीडीपीच्या १० टक्के ( सुमारे २० लाख रुपये) वचनबद्ध आहे. याने एमएसएमई आणि प्रामाणिक मध्यमवर्गीयसाठी मदती होईल.” #selfreliant India असा हॅशटॅग देखील सीतारमण यांनी दिला आणि. यानंतर त्यांनी पीएमओइंडिया आणि नरेंद्र मोदी यांना टॅग केले. सीतारामण यांच्या ट्वीटमध्ये मोठी चुकी झाली. ती म्हणजे त्यांनी २० लाख कोटी ऐवजी २० लाख लिहिले. ही चूक सीतारमण यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी दुसरे ट्वीट करत म्हणाले, “टायपिंगमध्ये चुक झाल्याबद्दल मला सर्वांनी माफ करा, २० लाख कोटी रुपये असे लिहून चुक दुरुस्त केली.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळणार

News Desk

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात ना ॲाक्सिजन,ना बेडची कमी…जिल्हाधिकाऱ्यांच होतयं कौतुक

News Desk

अमरावतीत लॉकडाऊन आणखी ७ दिवसांसाठी वाढवला

News Desk