HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान मोदींची आज ‘मन की बात’, तर कोरोना आणि पाचव्या लॉकडाऊनसंदर्भात काय बोलणार ?

मुंबई | देशताली चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनचा आज शेवटा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (३१ मे) सकाळी ११ वाजता दर महिन्याला ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहे. याआधीच केंद्र सरकारकडून काल (३० मे) केंद्राकडून पाचव्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला आहे. लॉकडाऊन पाच हा फक्त कंटेनमेंट झोन पुरताच मर्यादित असणार असून कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘मन की बात’मध्ये कोरोना आणि पाचव्या लॉकडाऊनद्वारे मोदी देशवासियांशी काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे. १ जून ते ३० जून असा हा लॉकडाऊन असणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असेल त्याचवेळी कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचेही लक्ष्य केंद्र सरकारने सांगितले आहे.

पाचव्या लॉकडाऊनच्या कर्फ्यूच्या वेळेतही सरकारने शिथिलता देण्यात आली आहे. तसेच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर केंद्राने राज्य सरकारकडे अधिक अधिकार दिले आहेत. आता राज्य किंवा जिल्ह्यांतील प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र राज्यातील वाहतूक व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. केंद्र सरकारने वाहतुकीबाबत निर्बंध हटवले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत आता होम क्वारंटाइन बंद, आयुक्तांनी दिले आदेश

News Desk

देशातील दररोजच्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात तुलनेने घट…

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी Twitter ने घेतला पुढाकार, 110 कोटींची केली मदत

News Desk