HW News Marathi
देश / विदेश

कुणी मुद्दामहून आमच्या वाटेला आले तर आम्ही त्याला सोडत नाही !

नवी दिल्ली | आम्ही स्वतःहून कुणाच्या वाटेला जात नाही. मात्र कुणी मुद्दामहून आमच्या वाटेला आले तर त्याला सोडतही नाही. असा स्पष्ट संकेत भारतीय लष्कराने शत्रूंना दिल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये सोमवारी (२८ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी ”मी जेव्हा तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी येतो तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अनेक आठवणी उभ्या राहतात”, असेही मोदी यावेळी म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

  • आम्ही स्वतःहून कुणाच्या वाटेला जात नाही. मात्र कुणी मुद्दामहून आमच्या वाटेल आले तर त्याला सोडतही नाही.
  • आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. मात्र देशाच्या सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.
  • येत्या काळातही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा प्रत्येक कठोर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देतो
  • गेल्या चार वर्षांच्या काळात देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
  • सध्याच्या परिस्थितीत भारत हा जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे ज्याच्याकडे जमीन, आकाश आणि पाण्यातून मारा करता येतील अशी अण्वस्त्रे आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारमधील 4 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी राजीनामा

News Desk

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

News Desk

काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

News Desk