HW News Marathi
देश / विदेश

झारखंडमधील चकमकीत ५ नक्षलवादी ठार, १ जवान शहीद

दुमका | झारखंड मधील दुमका येथे सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यात एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी उपचारासाठी हेलिकॉप्टरने रांची येथील रुग्णालयात नेण्यात आला आहे. शहीद झालेल्या जवानांचे नाव नीरज क्षत्री असे असून तो आसाम रेजिमेंटचा जवान आहे.

पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात १५ ते २० नक्षलवादीअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा!

News Desk

रॅगिंगचा भस्मासुर आपल्याकडे आजही किती बेबंद आहे !

News Desk

संजय राऊत राष्ट्रपती झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल !

News Desk