HW News Marathi
मनोरंजन

#IndependenceDay | कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली | देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. दरम्यान, दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती देशातील जनतेला संबोधित करतात. बुधवारी (१४ ऑगस्ट) संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित करून नागरिकांना ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांनी दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देणे, तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला मंजुरी अशा मोदी सरकारने घेतलेल्या ३ महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयांबाबत राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भाष्य केले आहे.

“जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यामुळे आता तेथील स्थानिकांना देशातील अन्य नागरिकांप्रमाणे अधिकार मिळतील. मोदी सरकारच्या या निर्णयाचा जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना मोठा फायदा होईल. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना आता विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे”, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी म्हणाले. “देशातील तिहेरी तलाकसारखा शाप अखेर संपुष्टात आल्याने आपल्या मुलींना न्याय मिळेल. त्या भयमुक्त जीवन जगातील”, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये झालेल्या कामाचे देखील राष्ट्रपतींनी यावेळी कौतुक केले. त्याचप्रमाणे, येत्या काळातही अशाच प्रकारचे काम व्हावे अशी आशा देखील राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

News Desk

नेहरुंच्या व्हायरल फोटोमागचे काय आहे सत्य…

News Desk

कपिल खोटं बोलतोय..

News Desk