HW News Marathi
देश / विदेश

भारताने सीमारेषा पार करू नये, चीनचा भारताला उपदेश

नवी दिल्ली | कोरोनाचे संकट एकीकडे मोठे होत जात असताना आता दुसरीकडे देशासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन संघर्ष पुन्हा उफाळून यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर, चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिनजियान यांनी उलट भारतालाच सूचना केल्या आहेत. “भारताने आपली सीमारेषा पार करू नये. भारताने हा मुद्दा आणखी चिघळेल अशी कोणतीही समस्या निर्माण करू नये”,असे चीनकडून सांगण्यात आले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिनजियान म्हणाले कि, “भारताने आपल्या सैन्याला ताब्यात ठेवावे. आपल्या सैन्यावर योग्य ते नियंत्रण ठेवावे. भारताने आपली सीमारेषा पार करु नये. कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण करु नये. भारताने असे कोणतेही एकतर्फी पाऊल उचलू नये कि ज्याने हा मुद्दा आणखी चिघळेल.” भारतीय लष्कराने मंगळवारी (१६ जून) रात्री दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या संघर्षात चीनचे देखील ४३ जवान मारले गेलेत तसेच जखमी देखील झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk

लडाखमधील हिमस्खलनात १० जण अडकले, लष्कराकडून बचावकार्य सुरू

News Desk

संजय राऊतांना UPAच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा अधिकार नाही !, नाना पटोलेंनी सुनावले

News Desk