HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये ५ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ अ केल्यानंतर राज्यातील फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर तब्बल १२ दिवसांनी काल (१७ ऑगस्ट) काश्मीरधील फोन आणि २ जी इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. जम्मूतील ५ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. या पाच जिल्ह्यात जम्मू, सांबा, कठुआ, रियासी आणि उधमपूर यांचा समावेश आहे. आता अफवांना रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर काश्मीरची परिस्थिती पाहता हळूहळू निर्बंध हटविण्यात येणार होते. सध्या जम्मूमध्ये हाय-स्पीड ३ जी व ४ जी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू केली जाणार आहे, असे अधिका-यांनी सांगितले आहे. पण राजौरी, किश्तवाड, दोडा आणि रामबन जिल्ह्यातील दिवसाची इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात याणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताजमहालची निगा राखा नाही, तर पाडून टाका | सर्वोच्च न्यायालय

News Desk

केंद्र सरकारची ४३ मोबाईल Apps वर बंदी 

News Desk

काँग्रेसची सरकार आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करू !

News Desk