HW News Marathi
देश / विदेश

डोवाल यांनी काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवण करत केली चर्चा

नवी दिल्ली | सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल ३७० रद्द करण्यात आले. यानंतर सुरक्षेतेचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काल (७ ऑगस्ट) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरमध्ये दाखल झाले असून त्यांनी शोपियनमध्ये काश्मीर नागरिकांशी संवाद साधून त्याचबरोबर स्थानिक नागिरकांसबोत जेवण केले, बिर्याणी खाल्ली. तेथील नागरिकांचे म्हणणेही ऐकून घेतले.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल ३७० रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. यानंतर पहिल्यांदाच अजित डोवाल जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. राज्यातील विविध ठिकाणच्या परिस्थितीची त्यांनी माहिती जाणून घेतली.

यापूर्वी डोवाल गेल्या महिन्यात अजित जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यानंतर अजित डोवाल दिल्लीला परतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या १०० अतिरिक्त तुकड्या म्हणजे १० हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ ए हटविण्यात आले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : हा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील जवानांवरील सर्वात मोठा हल्ला

News Desk

साखर उद्योगातील अडचणींसाठी फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट

News Desk

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध

News Desk