HW News Marathi
देश / विदेश

‘जनता कर्फ्यू’ असूनही शाहिनबागमधील आंदोलन सुरुच राहणार

नवी दिल्ली | सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात अनेक आंदोलने झाली. परंतु, दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेले आंदोलन कोरोनाच्या जागतिक संकटातही अद्याप सुरुच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी २२ मार्चला घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशीही आंदोलक आपले आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. प्रश्न असा आहे की जमाव बंदी लागू असताना इतकी लोक जाणार कुठे तर त्याचा तोडगाही आंदोलकांनी काढला आहे. एका टेंटखाली फक्त दोन महिला ठराविक अंतरावर असतील, पण आंदोलन सुरुच राहिल, असं एका आंदोलकाने सांगितले आहे.

दिल्ली सरकारने ५० पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे, थोडक्यात जमावबंदीच लागू केली आहे. आणि आता ५० वरुन ही संख्या २० वर आणली आहे. दिल्ली सरकारने लागू केलेला हा नियम शाहीन बाग आंदोलकांनाही लागू होतो, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. मात्र कुठल्याही परिस्थीत आंदोलन सुरु ठेवण्याच्या निर्णयावर या महिला आंदोलक ठाम आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या महिला शक्यतो सगळी काळजी घेत आहेत. त्यांचे चेहेरे बुरख्यात झाकलेले आहेत तसेच हात-पाय धुणे ही त्यांची जीवनशैली आहे. तसेच दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत असल्याकारणाने हात-पाय धुतले जातात अशी माहिकी एका महिला आंदोलकाने दिली आहे. २२ मार्चला दिल्लीतील मेट्रोही बंद असणार आहे तसेच दिल्लीतील सर्व रेस्टोरेंट्स ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चौकशी व्हावी, सत्य बाहेर येईल ! पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

News Desk

आम्हाला शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांची मागणी

News Desk

वाजपेयींच्या स्मृती जागवणारे १०० रुपयांचे नाणे

News Desk