HW News Marathi
देश / विदेश

कोची शिपयार्डमध्ये ओएनजीसीच्या ‘सागर भूषण जहाजावर भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

केरळ कोची यार्डमध्ये दुरूस्तीसाठी आलेल्या ओनजीसीच्या सागर भुषन जहाजावर स्फोट झाला आहे. या स्फोटात चार कामगार ठार तर 13 जण झखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळी बचाव पथक धाव घेऊन मदत करत आहे,

जहाजावर स्फोट काशामुळे झाले आहे. याची अद्याप माहिती मिळआली नाही. ओनजीसी जहाज कोची यार्डमध्ये दुरूस्थीसाठी आले होते . दुरूस्त चालू असताना जहाजावरील पाण्याच्या टाकीत स्फोट झाला आहे.त्या टाकीत दोन कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद असे त्यांचे नाव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इंधन दरात आज देखील घट कायम

swarit

Republic Day | स्टार्ट-अप इंडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रोत्साहन

News Desk

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकर यांची निवड

News Desk
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे !

News Desk

मुंबई | देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्र शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२ गुन्हे दाखल असून, यामध्ये तीन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत तर; दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत.

एकूण ३१ पैकी २० मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ आहे. आठ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६ टक्के मुख्यमंत्री हे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी.के. चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे.देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू प्रथम क्रमांकावर असून त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्याकडे केवळ २६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री आहेत.

देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. माणिक सरकार यांच्याकडे केवळ २६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे ३० लाख रुपयांची आणि जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे ५५ लाख रुपयांची संपत्ती आहे.

देशातील १९ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तर ५५ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती १ कोटी ते १० कोटी रुपयांदरम्यान आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे १७७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याखालोखाल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे १२९ कोटी रुपयांची तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर ४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे.

Related posts

आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार! – एकनाथ शिंदे

Aprna

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

Aprna

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्युज – अजित पवार

News Desk