HW News Marathi
देश / विदेश

राहुलच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर मायावतीने पाणी फेरले

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस सर्व विरोधकांना एकत्र आण्याचा प्रयत्न करुन महाआघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही महाआघाडी भाजपविरोधात सर्व विरोधक काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येण्याची जोरदार मोर्चेबांधणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्न करत होते.परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेससोबत आघाडी न करण्याची बसपा अध्यक्ष मायावती यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठे आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यात वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेस या तिन्ही राज्यातील छोट्या पक्षांनासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांचा होता. बसपाचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा आणि मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या बैठक झाली होती. परंतु चर्चेतून काहीच निष्कर्षसमोर आले नाही. यांतर मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाड नकरण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीलंकेत आज ८७ बॉम्ब हस्तगत, मध्यरात्रीपासून लागू होणार आणीबाणी

News Desk

अबू सालेमला सप्टेंबरमध्ये शिक्षा

News Desk

127वं संविधान संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर, आता जबाबदारी राज्यांवर!

News Desk