HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसकडुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुमला दिनाच्या शुभेच्छा

मुंबई | देशभरात १ एप्रिल हा दिवस ‘फूल्स डे’ म्हणून ओळखला जातो. ‘फूल्स डे’च्या निमित्ताने काँग्रेसने थेट भाजपावर टिका केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रविवारी एक ट्विट करण्यात आले. ‘बँक खात्यात १ एप्रिल २०१८ रोजी १५ लाख रुपये जमा झाले असून रेफरन्स क्रमांक ‘भाजपा४२०’. बँक खात्यातील एकूण जमा रक्कम 0.00 रुपये’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट करताना काँग्रेसने #HappyJumlaDivas हा हॅशटॅग दिला.

एप्रिल फूलनिमित्त काँग्रेसने सोशल मीडियावरुन भाजपावर खोचक टीका केली आहे. जुमला दिनाच्या शुभेच्छा, असे ट्विट करत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला असून काँग्रेसने सुरु केलेला #HappyJumlaDivas हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेकांनी एप्रिल फूलनिमित्त भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘शिवसेना’ काढताना वंशंजांना विचारलं होतं का, ‘शिवसेना नको आता ठाकरे सेना करा’ उदयनराजेंचं सेनेला चॅलेंज….

Arati More

पवारांच्या भाषणाची आठवून करून देणाऱ्या बायडेन यांच्या पावसातल्या भाषणाने अमेरिकेत सत्तांतर होणार का?

News Desk

‘बरे झाले, सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले’, फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणावरुन सामनातून टीका

News Desk
मुंबई

आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

News Desk

मुंबई | प्लास्टिक बंदीचा निर्णय सर्वसामान्य जनता, सरकार यांनी अजून गांभिर्याने घेतलेला नाही. पण युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मात्र प्लास्टिक बंदीसाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारचे पर्यावरण खाते शिवसेनेकडे आहे. रामदास कदम हे या खात्याचे मंत्री आहेत. त्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांनीच प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी रामदास कदम यांना सुचना केली होती. या सुचनेनुसार राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी एका बैठकीत शिवसेना भवनमधील कर्मचा-यांनी नेहमीच्या पद्धतीने पाण्याच्या बाटल्या दिल्या. या बाटल्या पाहताच आदित्य ठाकरे यांनी कर्मचारी व सेना भवनची व्यवस्था पाहणा-या पदाधिका-यांना या प्लास्टीकच्या बाटल्या बंद करण्याच्या सुचना केल्या. राज्यात प्लास्टिक बंदी झालेली आहे. त्यामुळे येथून पुढे सेना भवनमध्ये प्लास्टिक बाटल्या दिसता कामा नये, अशी ताकीदच ठाकरे यांनी दिली. त्यामुळे शिवसेना भवनमध्ये पाण्याच्या बाटल्याच काय, पण प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा दिसायच्या बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related posts

मरेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर दरम्यान रेल्वे रुळाला तडे

Gauri Tilekar

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेला ३१ मे ची डेडलाइन

News Desk

मुंबई विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

News Desk