HW News Marathi
देश / विदेश

मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे !

मुंबई | भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्वीट करत चीनच्या कुरापतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे “चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारले आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झाले. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?” असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हा संताप व्यक्त केला आहे.

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. ६ जून रोजी झालेल्या करारानुसार गलवान खोऱ्यातून सैनिकांना माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरू होती. भारतीय सैन्याची एक तुकडी जेव्हा नियंत्रण रेषेवरील चीनच्या सैन्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोहोचले तेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली आणि त्यात २० भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले. सुरुवातीला एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त धडकलं होतं. पण त्याची पृष्टी लष्कराने केली नव्हती. रात्री उशिरा लष्कराने अधिकृत माहिती देताना या झटापटीत २० जवान शहीद झाले

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार २.० : आजपासून पहिले अधिवेशन सुरू

News Desk

मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश

News Desk

रक्षाबंधनाला शौचालयाची भेट

News Desk