HW News Marathi
देश / विदेश

२५ ऑगस्टला मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार?

नवी दिल्ली येत्याआठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कॅबिनेटमध्ये बदल झाल्यानंतर भाजपमध्येही मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. काही मंत्र्यांना डच्चू देऊन संघटना बांधणीच्या कामासाठी धाडलं जाऊ शकतं, तर सध्या पक्षाच्या कामात असलेल्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

कॅबिनेट आणि संघटना बांधणीचे बदल याबाबत भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र २५ ऑगस्ट रोजी नव्या मंत्र्याचा शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता आहे. जदयू आणि एआयडीएमकेच्या प्रत्येकी दोघांना मंत्री पदे मिळू शकतात अशीही शक्यता आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ७१ मंत्री आहेत. विस्तारात आणखी १० जणांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. बिहार कोट्यातून दोन मंत्रिपदं दिली जाऊ शकतात अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. सृजन घोटाळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. घोटाळेमुक्त सरकार अशी सध्याच्या सरकारची प्रतिमा आहे ती जपण्यासाठी काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येऊ शकतं.

सध्या कॅबिनेट मंत्रिपदांपैकी संरक्षण, माहिती आणि प्रसारण, गृहनिर्माण आणि शहरविकास ही खाती इतर मंत्र्यांकडे आहेत. यामध्ये बदल होऊन ही खाती इतरांना दिली जाण्याचीही शक्यता भाजपच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Republic Day | प्रजासत्ताक दिनाची ही छायाचित्रे नक्की पहा

News Desk

आता फटाके फक्त दोन तासच फोडा !

News Desk

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

News Desk
क्राइम

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk

गडचिरोली – या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलींच्या विरोधात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान, नक्षलींच्या हल्ल्यात नव्हे, तर हृदयिवकाराच्या तीव्र धक्क्याने एका २४ वर्षिय पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. आशिष बळवंत कुमरे (२४) असे या पोलीस जवानाचे नाव असून कुरखेडा पोलीस उपविभागाच्या मुख्यालयात गडचिरोली पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्याला मानवंदना दिली.

कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत शीघ्र प्रतिसाद पथक कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीपूर जंगलात १९ ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. घनदाट जंगलातील डोंगर उतरत असताना आशिष याला अचानक अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागले. सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

Related posts

क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; मालाडमधून ३१९९ मोबाईल जप्त

Aprna

अभिनेता आदित्य पंचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk

लोहा येथे तरूणाचा खून

News Desk