HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानचे ३ पेक्षा अधिक जवान ठार तर १ जखमी

नवी दिल्ली | पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ कुरापती कायम आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. नियंत्रण रेषेवरील रावलकोट सेक्टरमध्ये झालेल्या भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानच्या ३ पेक्षा अधिक जवान ठार झाले असून १ जवान जखमी झाला आहे.

भारतीय सैन्याकडून शाहपूर, किरनी, कस्बा, मंधार, माल्टी या भागात पाकिस्तानी सैन्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांकडून ३ जवान मारले गेल्याची अधिकृत माहिती देण्यात येत आहे. मात्र, भारतीय लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ३ पेक्षा अधिक जवान मारले गेल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानकडून वारंवार नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानकडून सोमवारी पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १ जवान शहीद झाला असून ४ जवान जखमी झाले. यात एका पाच वर्षीय मुलीला देखील आपला जीव गमवावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

News Desk

न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार, बांग्लादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली

News Desk

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे सेवन का केले जाते?

Gauri Tilekar