HW News Marathi
देश / विदेश

‘स्वच्छ भारत अभियाना’साठी मुंबई पोलीस करणार पालिकेची मदत

मुंबई । देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल… शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे.

आता या स्वच्छ भारत अभियानात मुंबईचा क्रमांक उंचावण्यासाठी व हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई पोलीसही पालिकेच्या मदतीला सरसावले आहेत. पालिका आणि पोलीस आयुक्तांच्या समन्वयातून आखण्यात आलेल्या या योजनेनुसार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बकाल झोपडपट्टय़ा व रस्ते दत्तक घेऊन पोलीस तेथे स्वच्छता राहावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे अस्वच्छता करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांची नजर असणार आहे. आणि अस्वच्छता कमी होईल असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या विनंतीनुसार पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इतकेच नव्हे तर मुंबई पोलीस दलाने मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

इतकेच नव्हे तर मुंबईत स्वच्छता राखली जावी यासाठी आठवडय़ातून दोन वेळा पोलीस स्वत: श्रमदान करणार आहेत. त्याच प्रकारे येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईत अनेक पर्यटक येतात. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी या अभियानात सहकार्य करावे, त्याप्रकारची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जेणेकरून आपला उत्सव आणि संस्कृती ही जगभर सूंदर दिसावी. आपला परिसर स्वच्छ रहावा. यासाठी पालिकेची मदत यंदा पोलीस देखील करणार आहेत. तसेच वसाहतींमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. घरोघरी कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी करावी याबाबत पालिकेच्या सहकार्याने पोलीस नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, ४ विमानतळांवर असणार नियंत्रण

News Desk

या संकटसमयी अर्थमंत्री माझे नक्की ऐकतील…

swarit

सातव्या वेतन आयोगासाठी ५ जानेवारीला दीड लाख अधिकारी संपावर

News Desk