HW News Marathi
देश / विदेश

नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय

नवी दिल्ली | वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे. नीट ही परीक्षा वर्षातून दोनदा आणि ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू टर्न घेतला आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जुलै महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेली घोषणा मागे घेण्याची वेळी आली आहे. नीटची परीक्षा ऑनलाईन नव्हे, तर पेन, पेन्सिलद्वारे होणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यंदा नीटची परीक्षा ५ मे रोजी होईल, तर परीक्षेचा निकाल ५ जून रोजी लागणार आहे.

जेईई परीक्षा आगामी वर्षी जेईई परीक्षा घोषणा केल्याप्रमाणे वर्षातून दोन वेळा होणार आहे. मात्र ही परीक्षा ऑनलाईन होईल. जेईईची पहिली मुख्य परीक्षा पुढच्या वर्षी ६-२० जानेवारी आणि निकाल ३१ जानेवारी रोजी जाहीर होईल. तर जेईईची दुसरी मुख्य परीक्षा ६ ते २० एप्रिलला होणार असून निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या त्या ५ पोलिसांचं निलंबन अखेर मागे

News Desk

५ एप्रिलला रात्री ९ वाजता लाईट बंद करून दिवे लावा !

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

swarit

भोजपूर | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरामध्ये एका महिलेला काही लोकांनी मारहाण करून तिला निर्वस्त्र फिरवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नितीश कुमार यांच्या सरकारची पोल खोल झाली आहे.

एका युवकाच्या हत्येच्या संशयावरून या महिलेला मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ग्रामस्थांनी गावातील काही दुकानांना आग लावली. या घटनेनंतर बिहारमध्ये कायद्या सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय आहे ही घटना

बिहारचे एडीजी एस के सिंघल यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दामोदरपूर येथील रहिवासी विमलेश शहा (१९) नावाच्या युवकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. या घटनेनंतर दामोदरपुरातील ग्रामस्थांना वाटले की, कामाठी पुरात राहणाऱ्या लोकांनी गळा दाबून त्याला ठार केले. त्यानंतर विमलेशचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला, असे ग्रामस्थांना वाटले. विमलेशचा मृतदेह पाहून दामोदरपुरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत गावातील दुकानांना आग लावली. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर गावातील एका महिलेला पकडून तिचे कपडे फाडले आणि तिला पूर्ण बाजारात निर्वस्त्र फिरवून ग्रामस्थांनी मारले. भडकलेल्या ग्रामस्थांनी ट्रेनवर देखील दगड फेकून राग व्यक्त केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना शांत करण्यासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेत पोलिसांनी एकूण १३ जणांना अटक केली आहे. यात आरजेडीच्या नेत्याचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे एसएचओसह आठ पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केले आहे.

Related posts

राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारला दिला ‘हा’ सल्ला

News Desk

शोपियानमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

सततच्या निवडणुकीमुळे संसदेचे अधिवेशन आणि चर्चा प्रभावित; ‘वन नेशन वन इलेक्शन’ पंतप्रधानांकडून इशारा

Aprna