HW News Marathi
देश / विदेश

…नाहीतर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा !

नवी दिल्ली | केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये वाद सुरु असतानाच याबाबत आता स्वदेशी जागरण मंचाने एक मोठे वक्तव्य आहे. “आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सरकारसोबत काम करावे नाहीतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” असे स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक अश्विनी महाजन म्हणाले आहेत. “रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे सरकारशी जे काही मतभेद असतील ते त्यांनी सार्वजनिकरीत्या नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळांच्या बैठकीत मांडायला हवेत”, असेही त्यांनी म्हटले आहे.

आरबीआयचे डेप्युटी गर्व्हनर वीरल आचार्य यांनी काहीच दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी रिझर्व्ह बँकेला स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त केली होती. केंद्रीय बँकांना स्वायत्तता देण्याच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयामध्ये तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननेही केंद्र सरकारकडे ‘बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी’ करणारे पत्र लिहिले होते.

दरम्यान, नोटाबंदी, रेपोदर वाढ या संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयावर ऊर्जित पटेल यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऊर्जित पटेल हे गव्हर्नर पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

Gauri Tilekar

EVMHacking : हॅकर सैयद शुजाने केला टीमच्या ११ जणांच्या हत्येचा दावा

News Desk

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम : ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

Aprna