HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत जिल्हा सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात झालेल्या सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल १८ तास झालेल्या चकमकीत एका मेजरसह ५ जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये राजस्थानातील एस. राम यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुले या हल्ल्यानंतर राजस्थानातील बिकानेरच्या जिल्याधिकाऱ्यांकडून पाकिस्तानची नागरिकांना जिल्हा सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “पाकिस्तानी नागरिकांना येत्या ४८ तासांच्या आत जिल्हा सोडावा”, असे निर्देश बीकानेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

राजस्थानातील बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी पुढच्या २ महिन्यांसाठी पाकिस्तानी नागरिकांना हे आदेश दिले आहे. या जिल्ह्याधिकाऱ्यांनी एक यादी जारी केली असून सीआरपीसी १४४ कलम देखील लागू केल्याची माहिती दिली आहे. बीकानेरमधील हॉटेल्सवर देखील पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्याबाबतीत निर्बंध घालण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेच्या नाराजीमुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल ! निलेश राणेंचा टोला

Gauri Tilekar

प्रादेशिक भाषेतून न्यायालयाचे निकाल मिळावेत: राष्ट्रपती

News Desk

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राज्यपाल नियुक्तीचा विषय थेट मोदींच्या दरबारी!

News Desk