HW News Marathi
देश / विदेश

महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत

नवी दिल्ली | बोलता-बोलता अनेकदा अनेकांचा तोल जातो अशा नावांच्या यादीत पन्नालाल शाक्य यांचे नाव अग्रेसर आहे. पन्नालाल शाक्य यांनी एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका करताना बोले की, ‘काँग्रेसनं म्हटलं होतं की गरीबी हटवणार, पण त्यांनी तर गरिबांनाच हटवलं. तिथं अशा महिला आहेत. ज्या या नेत्यांना जन्म देतात… ज्या महिला संस्कारी मुलांना, समाजाच्या भल्याचा विचार न करणाऱ्या मुलांना जन्म देऊ शकत नाहीत त्यांनी वांझच राहावं’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.

या वादग्रस्त विधानामुळे मध्यप्रदेश मधील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य हे पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चेत आले.ते गुना इथून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. पण, महिलांविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील दोन बालकांना यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

swarit

कच्छ सीमेवर आढळलेले पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाकडून उध्वस्त

News Desk

मुंबई जगातील चौथे सर्वाधिक प्रदूषित शहर

swarit