HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात

नवी दिल्ली | आजपासून (१४ सप्टेंबर) संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे पहिल्यांदाच अधिवनेशनात मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र घेण्यात येणार आहे. तर सामाजिक अंतर ठेवतच संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिवेशनाआधी खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यात लोकसभेचे ५ खासदार आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा आणखी वाढतो का हे देखील पाहावं लागेल. सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. इतर वादग्रस्त मुद्दयांच्या चर्चेसह विधेयकांबाबत हे अधिवेशन कसे पार पडते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील महाभियोग याचिका मागे

News Desk

कमलनाथ सरकार पुन्हा अडचणीत, विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले ‘त्या’ आमदारांचे राजीनामे

News Desk

सीएलपी बैठकीत १०० आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची केली मागणी

News Desk