HW News Marathi
देश / विदेश

“मोदींनी ‘काम की बात’ऐवजी फक्त त्यांच्या‘मन की बात’ केली”, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा मोदींवर टोला

झारखंड | दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. त्यांच्या याच ‘मन की बात’वरुन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी चक्क पंतप्रधानांचाच समाचार घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी फोन केला पण ऐकून न घेता फक्त स्वतःचंच सांगत बसले असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या या ट्विटमध्ये हेमंत सोरेन म्हणतात, “आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असतं”.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झारखंड राज्यालाही संसाधनांचा तुटवडा भासत आहे. आपल्या अपेक्षित मदत मिळत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंग म्हणाले की, राज्याला रेमडेसिविर इंजेक्शनच्या फक्त २,१८१ कुप्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सिंग म्हणतात, “इतर कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. झारखंडला बांग्लादेशक़डून रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५०हजार कुप्या आयात करायच्या आहेत. मात्र, अजूनही परवानगी मिळालेली नाही”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअर स्ट्राईकमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र अमित कुलकर्णी यांचा समावेश

News Desk

‘जनता कर्फ्यू’ असूनही शाहिनबागमधील आंदोलन सुरुच राहणार

swarit

अन्यायाला वाचा फोडल्यानं सैनिकाने गमावली नोकरी ?

News Desk