HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मंगळवारी मुंबईत

मुंबई | पायाभूत गुंतवणुकीवरील बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जून रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी मुंबई भाजपाने २६ जून रोजी विचारमंथन आयोजित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख संवादक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल.

आर्थिक कामकाज विभाग, अर्थ मंत्रालय, हिंदुस्थान सरकार आणि आशिया इफ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) यांच्यातर्फे मुंबईत २५ आणि २६ जूनला आशिया इफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी)ची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. बैठकीत ‘पायाभूत सुविधांसाठी अर्थनिधी : नावीन्य आणि सहकार्य’ या विषयावर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल, अर्थसचिव सुभाषचंद्र गोयल उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिमांचा हातभार

swarit

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरपर्यंत येणारी ‘ती’ महिला कोण ?

News Desk

HW Exclusive | आता लातूर ‘कोरोना’मुक्त, समाधान वाटते !

News Desk
राजकारण

‘मन की बात’ मधून मोदींनी साधला भारतीयांशी संवाद

News Desk

नवी दिल्ली | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीयांशी मन की बात या कार्यक्रमाद्वारे ४५ व्या वेळी देशातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी योग, खेळ, जीएसटी आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्याविषयी विस्तृत चर्चा केल्याचे दिसून आले.

जगभरात नुकताच साजरा करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिन. या योग दिनाचा नरेंद्र मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जगाभरात योग दिवस उत्साहात साजरा झाला. योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला हे भावूक करणारे होते. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि अनेक महिलांनीही योगासने केली. जाती आणि धर्मातील सर्व सीमा तोडून देश योग करत असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

मोदींनी जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण यावेळी करुन दिली. ते म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. २३ जून रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली. वयाच्या 33 व्या वर्षी विद्यापीठाचे कुलगुरु पद त्यांनी भूषविले. भारतातील औद्योगिक वाढीत श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा सिंहाचा वाटा आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Related posts

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

News Desk

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

News Desk

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna