HW News Marathi
देश / विदेश

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आठ वाजता करणार देशाला संबोधित

नवी दिल्ली | कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ ऑगस्ट) पहिल्यांदा देशातील जनतेला संबोधित करणार आहे. मोदी आज संध्याकाळी आठ वाजता मोदी देशाला संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेला संबोधित करणार आहे. यामध्ये मोदी काश्मीरबद्दल नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदी बुधवारी (७ ऑगस्ट) देशाला संबोधित करणार होते. परंतु माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे शोक पाळण्यात आली होता. सरकाराने कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. यानुसार जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे केले असून दोन्ही देशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. परंतु लडाखमध्ये विधानसभेचे अस्तित्वात नसणार आहे. तर जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा अस्तित्वात असणार आहे. यावर आता राष्ट्रवादी रामनाथ कोविंद यांनी देखील विधेयकावर शिक्कामोर्तब केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, ३० हून अधिक नागरिक बेपत्ता

News Desk

तीन राज्यात आता काँगेसची सत्ता

News Desk

दहशतवादावर चर्चा करण्यास आम्ही तयार | इम्रान खान

News Desk