HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : शहीद जवानांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना बीसीसीआयकडून प्रशासकीय समितीला ५ कोटी रुपयांची मदत करण्याची मागणी केली जात असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सी के खन्ना यांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले. जगभरातून या दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या शहीद जवानांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. देशभरातून या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत.

बीसीसीआयने आयपीएलमधील संघ मालकांनाही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याआधी भारतीय संघाचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने देखील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सेहवाग या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. “शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे थोडेच आहे. मात्र या जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी मात्र आपण प्रयत्न करू शकतो. या शहीद जवानांच्या मुलांनी जर आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये प्रवेश घेतला तर ते माझे भाग्य असेल”, असे ट्विट सेहवाग यांनी केले होते. तर गौतम गंभीर जवानांच्या ५० मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करतात. आता यापुढे १०० जवानांच्या मुलांना मदत करण्याचा निर्णय गंभीर यांनी यावेळी घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही | संजय राऊत 

News Desk

उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी

News Desk

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट

News Desk