HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी चांगलेच धास्तावले आहेत. या दहशतवाद्यांनी आता त्यांचे तळ आता प्रत्यक्ष ताबा रेषेपासून दूर आणि पाकिस्तानी लष्कराच्या जवळ हलविले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय लष्कराला देण्यात आलेले संपूर्ण स्वातंत्र्य आणि इतर देशांच्या दबाव याची या दहशतवाद्यांनी धास्ती घेतल्याचे समजते.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून संतापाची लाट उसळली. ‘पाकिस्तानला धडा शिकवा’ ही एकमेव मागणी सध्या सर्वच स्तरातून होत आहे. पाकिस्तानवर इतर राष्ट्रांचाही दबाव वाढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फरार’ विजय माल्ल्या

News Desk

‘अब्बा जान’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना म्हणाले….!

News Desk

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk