HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी हे बोलून न्यायालयाचा अवमान केला !

मुंबई | “आता सर्वोच्च न्यायालय देखील म्हणत आहे कि राफेल करारात घोटाळा झाला आहे. आता न्यायालयानेच सांगितले आहे कि चौकीदार चोर है. पंतप्रधान मोदींनी आता माझे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारावे”, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांचे हे वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे आहे”, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणी झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीबाबत राहुल गांधी यांनी काहीही वाचले नाही, असेही निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याची तयारी दाखविली. त्याचप्रमाणे पुराव्याखातर दिलेल्या कागदपत्रांवर केंद्राने घेतलेले आक्षेप देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले.याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सादर करण्यात आलेली कागदपत्रे ही वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

News Desk

टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करीत पोलिसांनीच केली लुटालूट

News Desk

काळोखात पाप करू नका, काय असेल ‘ते’ उजेडात करा !

News Desk