HW News Marathi
Covid-19

“टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता लस द्या”, राहूल गांधी कडाडले

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशात एकीकडे रूग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण देखील सुरू आहे. मात्र, काही राज्यात पुरेशा लसी नसल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातही ही परिस्थिती ओढवली आहे.

३८५ दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

लसीकरणाचा वेग वाढवा – राहूल गांधी

लसींची निर्मिती करणाऱ्या आवश्यक ती साधनसामुग्री पुरवली पाहिजे. त्यांना सुविधा द्या, म्हणजे लसीचं उत्पादन वाढेल. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिलं ७५ टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको !

News Desk

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि कुटुंबाला होम क्वारंटाईन करा,बीडकरांची मागणी !

Arati More

“एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?”, भाजपने मुख्यमंत्र्यांना डिवचले

News Desk