HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या प्रगती पुस्तकामुळे राहुल गांधींवर टिकेची झोड  

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे. याचाच एक भाग गुरुवारी पहायला मिळाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगतीपुस्तक आपल्या ट्विटरवर पोस्ट केले. या पोस्टच्या माध्यमातून कॉंग्रेस अध्यक्षांनी भाजपला कृषी क्षेत्रात आलेल्या अपयशाचा आढावा घेतला आहे.

कर्नाटकमध्ये भाजपने एक पैशाचीही शेतकरी कर्जमाफी दिली नाही. त्याच बरोबर मोदी सरकारच्या कार्यकाळात पीकविमा योजना देखील अयशस्वी ठरली. त्यामुळे या सर्वाचा फायदा शेतक-यांना नव्हे तर फक्त खाजगी कंपन्यांना झाल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. ट्विटमध्ये राहुल गांधीनी हमीभावाच्या मुद्यारुन भाजपावर ताशेरे ओढले. येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक रक्कम हमीभाव म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा बिलकूल फायदा झाला नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. परंतु राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी कॉंग्रेसवर उलटून टिका केल्याचे पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतीय लष्कराला तोफांच्या रूपात दिवाळी भेट

swarit

भाजपला जेव्हा कोणी विचारतही नव्हतं तेव्हा आमच्या कुटुंबाने ….! । प्रीतम मुंडे

News Desk

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारच्या सर्व २१ मंत्र्यांचे राजीनामे

News Desk
मनोरंजन

सरकारने आमचा अपमान केला – प्रसाद ओक

swarit

नवी दिल्ली : ‘सरकारने आमचा अपमान केला असून आम्ही सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेते या सोहळ्यावर बिहिष्कार टाकणार आहोत,’ अशा शब्दात अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रपतींऐवजी दुसरे कोणी जर पुरस्कार देणार असतील तर ते आमचे कष्ट, आमच्या भाषेचा अपमान आहे”, असे सांगत प्रसाद ओक यांनी नाराजीचा सूर आळवला आहे.

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात ६५ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करणे ही एक परंपरा आहे. पण, यंदा केवळ ११ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शक केलेला ‘कच्चा लिंबू’ या सिनेमेला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Related posts

बीग बी अमिताभ गोत्यात!

News Desk

चॉकलेट फज

News Desk

‘पियानो फॉर सेल’चा ग्रँड प्रीमियर सोहळा संपन्न

News Desk