HW News Marathi
क्राइम

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

जयपूर | राजस्थानच्या बाडमेरमधील राम कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान कार्यक्रमाच मंडप कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे कोसळ्याची माहिती मिळाली आहे. कोसळलेला तंबू आणि पावसामुळे करंटसुद्धा पसरला होता अशी माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत मंडपाच्या तंबूखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजस्थान प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, वहीत रेखाटले आत्महत्येचे चित्र

News Desk