HW News Marathi
देश / विदेश

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये वाढ पाव टक्क्यांने केली आहे. आरबीआयने बुधवारी (१ ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ करून तो व्याजदर ६.५० टक्क्यांवर गेला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढ ६.२५ टक्क्या इतका झाला आहे.

आर्थिक विकासाला गती देण्याचे कारण देत व्याजदरात वाढ करण्यात आली असून गव्हर्नर उर्जित पटेल यांनी हे पतधोरण जाहीर केले आहे. मोदी सरकारच्या ४ वर्षाच्या कार्यकाळात आरबीआयने दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागते.

रेपो रेट म्हणजे काय?

भारतीय रिझर्व्ह बँककडून पैसे घेते तो दर म्हणजे रेपो रेट होय. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना आरबीआयकडून मिळणआऱ्या कर्जदरात वाढ होणे होय. बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. परंतु हे दर वाढले तर बँकांचे कर्जही महाग होते. आण याचा फटका ग्राहकांना बसतो.

रिव्हर्स रेपो रेटे म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सना ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक

News Desk

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk

आठ वर्षाची चिमुकली म्हणाली लंटाईमध्ये शिक्षक रोज वरच्या खोलीत नेतात, माझ्याशी घाण काम करतात

News Desk
मुंबई

दादर स्थानकाचे चैत्यभूमी नामांतर झालेच पाहिजे | दलित युथ पॅंथर

News Desk

मुंबई | आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दादर स्थानकाचे चैत्यभूमी नामांतर झालेच पाहिजे या मागणीसाठी दलित युथ पँथरच्या वतीने दादर पश्चिम येथील कामत हॉटेल समोर केशवसुत उड्डाण पुलाखाली निर्दशने करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या मानव मुक्तीचा लढा मुंबईतून केला होता. त्यांचे निवासस्थान राजगृह,आंबेडकर चळवळीतील केंद्रबिंदू आंबेडकर भवन दादर हेच होते.

महामानवाचे येथेच अंतिम संस्कार केले होते.म्हणून आमची एकच मागणी आहे दादर स्थानकाचे चैत्यभूमी हे नामांतर झालेच पाहिजे अशी मागणी अध्यक्ष निलेश मोहिते यांनी समस्त दलितांच्या वतीने केली आहे,ती मागणी तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली नाही तर येत्या ६ डिसेंबरला येणारा मोठा जनसमुदाय हे दादर स्थानक मुंबई तसेच रेल्वे दादर स्थानकावरून एकही रेल्वे पुढे सोडणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दलित युथ पँथर ची युवा पिढी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती.

Related posts

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास सरकारचा पुन्हा नकार ; काय म्हणाले या चर्चेत धनंजय मुंडे

News Desk

अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिरातीला सरकारचं प्रोत्साहन ?

News Desk

मुंबईच्या समुद्रात दररोज मिसळते लाखो लिटर सांडपाणी

News Desk