HW News Marathi
देश / विदेश

शहिद जवानांच्या मृतदेहाची विटंबना

नवी दिल्लीः भारतमातेचे भांडवल करून जवानाविषयी प्रचंड आपुलकी, प्रेम व्यक्त करणाऱ्या भाजप सरकारने जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. यातील जवानांचे मृतदेह शवपेट्यांमधून नेण्याऐवजी ते पुठ्ठ्यांच्या बॉक्समधून नेण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी याबद्दलचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये जवानांचे मृतदेह पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे दिसत असून हे बॉक्स दोरीने बांधण्यात आले आहेत.

दुर्देवाची बाब म्हणजे, देशभरात हवाई दल दिन साजरा होत असताना ही घटना घडली. याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केल्यावर लष्कराने आपली चूक सुधारली आणि जवानांचे मृतदेह लाकडी शवपेट्यांमध्ये ठेवले. जवानांच्या बलिदानाचा बावू करणाऱ्या या सरकारला मात्र हे चित्र दिसत नसल्याबद्दल खेद व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना

News Desk

…तर भाजप सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढला नसता !

News Desk

“…तर तुम्ही केंद्र सरकारलाही देशविरोधी म्हणाल का?”

News Desk