HW News Marathi
देश / विदेश

आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवली ‘ही’ जबाबदारी

नवी दिल्ली | देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस हायकमांडच्या जवळचे मानले जातात. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यांतर पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाले की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत आसाम निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे.

निवडणूक आयोगाने नुकतंच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक तारखांची घोषणा केली आहे. यामध्ये आसामचाही समावेश आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवार निवडणुकीसाठीची समिती अर्थात स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडे सिंह या समितीच्या सदस्या असतील.आसामची निवडणूक ३ टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान २७ मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान १ एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान ६ एप्रिलला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk

उन्नाव सामूहिक बलात्कार अपघात की घातपात, राहुल-प्रियांकाचे भाजपवर टीकास्त्र

News Desk

चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी, केंद्र सरकारने जारी केली नियमावली

News Desk