HW News Marathi
देश / विदेश

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर

जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालनाने ५० हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात सलमानला पुन्हा एकदा ७ मे ला कोर्टासमोर हजेरी लावावी लागणार आहे. तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे. या दोन अटींवर सलमानला जामीन मंजूर झाला आहे.

गेल्या २० वर्षापासून रखडलेल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला गुरुवारी जोधपूर सत्र न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा आणि १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सैफ आली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर सलमानने दोन रात्री जोधपूर मध्यवर्ती कारागृहातमध्ये काढल्या आहेत.

सलमानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर बिष्णोई समाजाच्या वकिलांनी सलमानच्या जामीनाला विरोध केला. सलमानच्या जामीनावर तब्बल २ तास युक्तीवाद सुरू होता. त्यानंतर कोर्टाने ब्रेक घेऊन, दुपारी ३ वाजता सलमानला जामीन मंजूर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“महाविकास आघाडीचा जन्मच….”, कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील धुसफुसीवर दावनेंचं वक्तव्य

News Desk

सरकारचा ‘फेक न्यूज’ संदर्भातील निर्णय मागे

News Desk

इस्रोकडून तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीभोवतीच्या कक्षेत केले स्थापित

Aprna
महाराष्ट्र

काँग्रेसमुळे देशात लोकशाही टिकून राहिली | नाना पाटेकर

News Desk

पुणे | गेल्या साठ वर्षात देशात लोकशाही टिकली ती काँग्रेस पक्षामुळे. हे वक्तव्य अभिनेता नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत असताना केले. याचवेळी त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपदी बघण्याची इच्छा व्यक्त केली.

काँग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणू नका, इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचे आहे असं म्हणत नाना पाटेकर यांनी वर्धापन दिनीच भाजपला टोला लगावला. देवेगौडा पंतप्रधान झाले पण शरद पवार झाले नाहीत. ते मुख्यमंत्री, कृषीमंत्री झाले पण पंतप्रधान होता होता राहिले.

एक मराठी माणूस म्हणून पवार पंतप्रधान व्हावेत असं वाटते असंही नानांनी म्हटलंय. सलमान खान ला झालेल्या शिक्षे बाबत कायद्या समोर सर्व समान आहेत एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Related posts

आरोपीच्या सांगण्यावरून कारवाई कशी होऊ शकते? हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

News Desk

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला; चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Aprna

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk