HW News Marathi
देश / विदेश

बारामुल्ला जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळताच भारतीय सैन्याने या भागात शोधमोहीम सुरु आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये गुरुवारी (२१ फेब्रुवारी) रात्रीपासून ही चकमक सुरू आहे. या भागात जवळपास २ ते ३ दहशतवादी लपून बसले असून या परिसराला घेराव घालण्यात आला आहे. हे दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यात येत असून सुरक्षा दलाकडून याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी आता दहशतवाद्यांवर दंड थोपटले आहेत. या हल्ल्यात ४० जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य दहशतवाद्यांविरोधी मोहीम राबविण्यास सज्ज झाले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक पवित्र्याने धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी आपले तळ हलवून आता ते पाकिस्तानी लष्कराच्या आश्रयाला गेले आहेत.

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती मात्र अद्याप थांबलेल्या नाहीत. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. काश्मीरच्या खोऱ्यात एकूण ६० दहशतवादी सक्रिय असून त्यापैकी ३० हून अधिक दहशतवादी हे पाकिस्तानचेच आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी या ६० दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडणार असून या मोहिमेला ‘ऑपरेशन ६०’ असे नाव देण्यात येणार आहे. सध्या लष्कराकडून ऑपरेशन २५ राबविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Article370Abolished : काश्मीरच्या निर्णयावर पाकिस्तानचा जळफळाट

News Desk

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

swarit

२० एप्रिलपासून राज्यातील ठराविक भागांत एसटी-बेस्ट वाहतूक सुरु होणार

Gauri Tilekar