HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! प्रसूती करण्यापूर्वी दोन डॉक्टर एकमेकांशी भांडत राहिले.. बाळाचा गर्भात जीव गेला

जोधपूरः येथील सर्वात मोठ्या रुग्णालयात दोन डॉक्टरांमधील वादात एका बालकाचा जीव गेला. वादाचा सर्व प्रकार मोबाइलमध्ये कैद झाला आहे.

एक महिलेला सिझरिअनद्वारे प्रसुती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार महिलेला ऑपरेशन थिएटरमध्येच दाखल करण्यात आले. परंतु ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टरांमध्ये वाद झाला. एकमेकांना शिविगाळ सुरू झाला. तिकडे गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. परंतु दोघा डॉक्टरांमधील वादामुळे महिलेकडे कुणाही लक्ष दिले नाही. भूल ज्युनिअर डॉक्टराने द्यायची की सिनिअरने याचा वाद रंगला. अखेर तू-तू मै-मै करत या डॉक्टरांनी कसेबसे सिझर केले. बाळा जन्माला आले देखील परंतु ऑपरेशन करण्यात दिरंगाई झाल्याने बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. या घटनेची बाहेर वाच्यता झाली नाही. परंतु डॉक्टरांमधील वादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरमधील गलथान प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. संबंधित डॉक्टरांवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. डॉक्टरांना वाद घालण्याऐवजी वेळीत ऑपरेशन केले असते तर त्या बाळाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिमाचल प्रदेशात दरड कोसळली, ९ पर्यटकांचा मृत्यू

News Desk

#PulwamaAttack | मातृभूमीसाठी जम्मूतील डॉक्टरांनी घेतली ‘ही’ प्रतिज्ञा

News Desk

या ट्रेलरनंतर पिक्चर कधी रिलीज करायचा ते सैन्याचे नेतृत्व ठरवेल !

News Desk
देश / विदेश

गोरखपूरमध्ये ४८ तासांत आणखी ३० बालकांचा मृत्यू

News Desk

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन टँकअभावी ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा ४८ तासांमध्ये ३० बालकांना जीव गमवावा लागला आहे. येथील बाबा राघवदास रुग्णालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बाबा राघव दास रुग्णालय काही दिवसांपूर्वी ७० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला होता. या रुग्णालयात गेल्या ४८ तासांमध्ये ३० बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर गेल्या ७२ तासांत रुग्णालयातील तब्बल ६१ बालकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने ही आकडेवारी दिली आहे.

मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजातांना भेडसावणाऱ्या विविध जीवघेण्या समस्यांनी या ३० तीन बालकांचा जीव घेतला आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झालेले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डातील ११ बालकांनी प्राण गमावले. याच काळात एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रोगांचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोगराई पसरुन मृतांचा आकडा वाढेल,अशी भीती व्यक्त होत आहे.

Related posts

वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल,मग बसा बोंबलत! – सामना

News Desk

येडियुरप्पा सरकारचा पहिला निर्णय, ‘टीपू सुलतान’च्या जयंतीवर बंदी

News Desk

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू?, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

Aprna