HW News Marathi
देश / विदेश

शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | शोपियान जिल्ह्यात रविवार (१८ नोव्हेंबर)ला भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त मोहीम राबवित या दहशतवाद्यांना ठार केले.

 

शोपियान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर जवानांनी शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर घटनास्थळावरून एक एके-47 आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. शिवाय, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे. अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोटात ६ भाजप कार्यकर्ते जखमी

News Desk

राहुल गांधींनी घेतला केरळच्या पूरस्थितीचा आढावा, केंद्राला मदत करण्याचे आवाहन

News Desk

एअर इंडिया अधिकृतरित्या टाटा समूहाकडे स्वाधीन

Aprna